चंदगड/प्रतिनिधी : नुकताच सुरू झालेल्या पावसामुळे चंदगड तालुक्याच्या पश्चिमेला असणाऱ्या सह्याद्री पर्वतरांगावरून वाहणाऱ्या धुक्यांचा अल्हाद वातावरण. प्रतिमहाबळेश्वर म्हणून पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या तिलारी भागातील खेतोबा हा पॉईंट पर्यटकांना आकर्षित करत असतो.पण याच पर्यटन स्थळावर सध्या रानगवे पर्यटनासाठी येत असल्याचे चित्र समोर आले असून, पर्यटकांना वन्य प्राण्यांना जवळून पाहण्याचा अनुभव येत आहे. रानगवे मोखाटपणे या परिसरामध्ये फिरत असून पर्यटकांनी या गव्यांना त्रास देऊ नये अशा सूचनाही वन विभागाकडून फलकाद्वारे सूचित करण्यात आले आहे. चंदगड तालुका म्हणजे महाराष्ट्रातील प्रति महाबळेश्वर आहे असं म्हटलं जातं.
निसर्गाच्या आल्हादायक वातावरण या ठिकाणी पसरला असून याचा मनमुराद आस्वाद पावसात घेण्यासाठी महाराष्ट्र बरोबरच कर्नाटक आणि गोव्याचे पर्यटकही या ठिकाणी येतात. शिवाय येणाऱ्या पर्यटकांची चांगली व्यवस्था या परिसरात करण्यात आल्यामुळे पर्यटकांचा ओढा वाढला असून हा संपूर्ण परिसर जंगल व्याप्त असल्यामुळे जंगलात गवा रेडा बरोबरच अस्वल ,बिबट्या, वाघ, भेकर ,साळींदर ,शेकरू या प्राण्यांचेही दर्शन काही वेळेला पर्यटकांना होत असल्याने पर्यटकांचे आकर्षण वाढले आहे. ज्या ठिकाणी पर्यटन स्थळ आहेत त्या ठिकाणी ही जंगली प्राणी मुक्त संचार करत असल्यामुळे तेही पर्यटनाला आलेत की काय असा अनुभव येथे येणारे पर्यटक घेत आहेत.
Post a Comment
0 Comments