चंदगड/प्रतिनिधी : अलबादेवी येथील रविंद्र शंकर पाटील वय,३२ हा युवक सकाळी चाळोबा नावाच्या शेतामध्ये काजू वेचण्यासाठी गेला असता पाठीमागून येवून गव्याने जोराची धडक दिली.त्याचबरोबर फरफटत नेवून गंभीर जखमी केले. यावेळी आरडाओरडा केल्यानंतर गवारेडा जंगलात पळून गेला.जोरदार धडक दिल्यामुळे रविंद्रच्या डोके व मणक्याच्या हाडांना गंभीर दुखापत झाली आहे.
यावेळी काजू बागेच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी त्याला गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.रविंद पाटील याची आर्थिक परिस्थिती हलाकीची असुन वन विभागाकडून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे.
Post a Comment
0 Comments