Type Here to Get Search Results !

दहशतवाद्यांना घरात घुसून मारा-आ.भास्कर जाधव

 


(काश्मीर मधील हल्ल्यामध्ये मृत्यु मुखी  पडलेल्याना मी प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो -आ. जाधव)


गुहागर/प्रतिनिधी : काश्मीर खोऱ्यामध्ये पर्यटकांवरती जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांना मी प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या शब्दांमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


आमदार जाधव पुढे म्हणाले की, ज्यांनी कुणी हा हल्ला केला आहे,त्याला सरकारने चांगला धडा शिकवला पाहिजे.त्यांना त्यांच्या घरात घुसून मारलं पाहिजे त्यासाठी आम्ही सरकारच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत असे आमदार जाधव यांनी सांगितले. दहशतवादी हे पोलीस वेशामध्ये आले होते आणि ते पर्यटकांमध्ये मिसळले होते.दहशतवादी हे विचारून-विचारून पर्यटकांना गोळ्या घालत होते.असे वक्तव्य आमदार भास्कर जाधव यांनी केले. आमदार जाधव असे ही पुढे म्हणाले की,आपली सुरक्षा यंत्रणा दिवसा गणिक ढिलि होत चालली आहे. ती अधिक मजबूत व्हावी आणि दहशतवाद्यांना सरकारने धडा शिकवावा यासाठी आम्ही सरकारच्या सोबत आहोत असेही शेवटी आमदार जाधव यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments