चंदगड/प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारने ग्रामीण भागात पाणी हा मूलभूत घटक असल्याने सर्व गावोगावी लोकांना याचा लाभ मिळाला पाहिजे याकरिता जल जीवन मिशन योजना सुरु केली. त्यामुळे प्रत्येक कुटूंबाला नळपुरवठा झाल्याने ग्रामीण भाग समृद्ध होईल या हेतूने सरकारने एक पाऊल पुढे टाकत विकासाला चालना दिली असून राज्यभर या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ग्रुप ग्रामपंचायत उमगाव-न्हावेली येथे विविध विकासकामे पार पडत असून शनिवार,दि.27 एप्रिल 25 रोजी न्हावेली येथे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत जॅकवेल भूमिपूजन करण्यात आले.
या विकासाकामाचे उद्घाटन सरपंच राधा कृष्णा सावंत यांच्याहस्ते पार पडले.याप्रसंगी उपसरपंच पुंडलिक तळकटकर,सदस्य सुभाष पेडणेकर,दत्तू नांगरे,विद्या गावडे,दत्ताराम रेडकर,नंदिनी गावडे,पार्वती गावडे,पोलीस पाटील मनोज गावडे,माजी सरपंच रुकमाना गावडे,सामाजिक कार्यकर्ते अशोक पेडणेकर,कृष्णा सावंत, चंद्रकांत गावडे,नारायण गावडे,इराप्पा हाजगुळकर,लक्ष्मण पाटील,विठ्ठल गावडे,पांडुरंग गावडे,रावजी पेडणेकर,प्रमोद फडणीस,गोविंद गावडे,संजय पेडणेकर,नामदेव पेडणेकर,ठेकेदार शिवाजी चव्हाण व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments