Type Here to Get Search Results !

बालसंगोपन लाभार्थीच्या कागदपत्रांची पडताळणी चंदगड येथे व्हावी-पालक



(प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे पालकांकडून नाराजी,आमदार शिवाजीराव पाटील यांच्या फोननंतर प्रशासन सक्रिय)


चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुक्यामध्ये महिला बालकल्याण विभागाकडे बालसंगोपन योजनेचे  106 लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केले असून गेल्या वर्षभरापासून हे लाभार्थी आपल्याला लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. जेव्हा आमदार शिवाजीराव पाटील यांच्या ही गोष्ट लक्षात आली. तेव्हा त्यांनी महिला बालकल्याण विभागातील अधिकारी यांच्याशी बोलण्यासाठी आपल्या स्विच सहाय्यकांना सांगितले व इतका वेळ ही प्रकरण प्रलंबित असण्याबाबतचा जाब विचारला अन्यथा या विषयाबाबत मला अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न विचारून आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी लावावी लागेल. अशा पद्धतीने अधिकार्यांना धाक दिल्यानंतर ही प्रकरण तात्काळ मार्गी लागलेली आहेत. परंतु चंदगड तालुक्यातील 106 लाभार्थ्यांची कागदपत्रके पडताळणी करण्यासाठी गुरुवार दिनांक 8 मे 25 रोजी सर्व लाभार्थ्यांच्या पालक व लाभार्थी यांना कोल्हापूर या ठिकाणी बोलवून नाहक त्यांना उदंड बसवण्याचा प्रकार जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. हे अतिशय चुकीची असून पालकांच्या मधून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. 


106 लाभार्थी व त्यांचे पालक मिळून 212 लोकांना कोल्हापूरला बोलवण्यापेक्षा त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी चंदगडलाच येऊन त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली असती तर बरे झाले असते.त्यामुळे लाभार्थ्यांना होणारा आर्थिक भुर्दंड थांबला असता.तसेच प्रवासामध्ये होणारे विद्यार्थी आणि पालक यांचे हाल थांबले असते.अशा पद्धतीची प्रतिक्रिया समाजातून व्यक्त केली जात आहे.याबाबत चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्याशी एका पालकांने संपर्क साधून सर्वांची कागदपत्रे चंदगड पंचायत समितीत तपासणी करण्यासाठी विनंती केली.तेव्हा आपण जिल्हा परिषदेचे सि.ई.ओ .यांच्याशी बोलून याबाबतची पडताळणी पंचायत समिती मध्येच करण्याबाबत आपण सांगणार असल्याचे सांगितले आहे. 


चंदगड चंदगड हा अतिशय डोंगराला भाग असून चंदगड तालुक्यातील वाड्या वस्तीवरून येणाऱ्या सर्व विद्यार्थी व  पालकांना खूप त्रास सहन करावा लागणार आहे . तसेच त्यांना वेळेवर पोहोचणे व तेथील पडताळणी करून वेळेवर घरी पोहचण्यामध्ये देखील खूप अडचणी निर्माण होणार आहेत. याबाबत प्रशासन काय विचार करणार की नाही असा सवाल सर्व लाभार्थ्यांच्या पालकांच्या मधून व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments