चंदगड प्रतिनिधी/भरमु शिंदे : माणगाव येथील बारामाही वाहत असणारी ताम्रपर्णी नदी काठी पुलावर दोन्ही बाजूला बसविण्यात येणारा लोखंडी कठड्याच्या पाईप्स चोरीला गेल्याने त्या पुलावरून वाहतूक करणे प्रवासाच्या जीवावर बेतत आहे. नदीपात्रात बारामाही पाणी वाहत असल्याने त्या पुलावरून दोन गाड्या पास होणे कठीण आहे, कारण अरुंद असणारे पूल वाहतूकीला धोका ठरत आहे. एकाबाजूने गाडी आली असता समोरून येणाऱ्या गाड्यानी ती गाडी त्या पुलावरून जाईपर्यंत बाजूला थांबावे लागते . अशा परिस्थितीत खूप वर्षा पासून असेच दळणवळण होत असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे, परिणामी नागरिकांच्या सुरक्षेचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला असून लोकप्रतिनिधी व प्रशासन याकडे लक्ष देतील का? अशी चर्चा तेथील नागरिकांतून केली जात आहे.
पहा, पुलावरील सुरक्षा कठड्याची भयानक अवस्था...
या अरुंद पुलाची पुनरबांधणी तात्काळ करावी, व भविष्यात होणारा धोका टाळावा असे न केल्यास मोठी दुर्घटना घडू शकते अशी संतापजनक प्रतिक्रिया स्थानिक नागरिकाकडून बघायला मिळत आहे.
Post a Comment
0 Comments