(आ. शिवाजी पाटील यांची मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे मागणी)
चंदगड/प्रतिनिधी : चंदगड तालुका हा जिल्ह्यात विस्ताराने मोठा आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम असलेला भाग आहे. तालुक्याच्या आरोग्यसेवेचा दर्जा उंचावावा आणि आरोग्यसेवा सहजपणे सर्वसामान्य जनतेला उपलब्ध व्हावी, यासाठी आमदार शिवाजी पाटील यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे विशेष मागणी केली.तालुक्यातील अनेक गावे अजूनही जंगलातील वाटांनी जोडली आहेत. काही गावांमध्ये रुग्णांना उपचारासाठी तब्बल २५-३० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. यामध्ये वेळेअभावी आणि चंदगड ग्रामीण रुग्णालयात आयसीयू सुविधा, रक्तपेढी, एक्स-रे आणि सोनोग्राफीसारखी अत्याधुनिक यंत्रणा द्यावी. दुर्गम भागात २४ तास सेवा देणाऱ्या मोबाईल आरोग्य युनिटस् कार्यरत करा. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांची नेमणूक करावी. अॅम्ब्युलन्स वाहनांची व्यवस्था करावी, अशा मागण्यात आ. पाटील यांनी केल्या.
उपचाराच्या अभावामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.चंदगड शहरात असलेले ग्रामीण रुग्णालय अपुरी यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता आणि अत्याधुनिक सुविधा नसल्यामुळे गंभीर रुग्णांना कोल्हापूर, बेळगाव किंवा गोव्यात नेण्याची वेळ येते. या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यासाठी विशेष आरोग्यसेवा योजनेची मागणी केली.या मागण्यांबाबत मंत्री आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.यावर कृती आराखडा तयार केला जाईल, असे अभिवचन दिले.
Post a Comment
0 Comments