Type Here to Get Search Results !

अभिजात मराठीसाठी मराठी शाळा टिकल्या पाहिजे -पत्रकार संजय कुट्रे

 


(वाढदिवसानिमित्त किणी येथील प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप)


चंदगड (प्रतिनिधी) : माय मराठीला अभिजात दर्जा मिळाला असून त्याची महती सर्वदूर पोहचली पाहिजे. पण, त्यासाठी आधी ती टिकली पाहिजे. म्हणूनच मराठी शाळा टिकल्या पाहिजे. त्या जर टिकवायच्या असतील तर पालकांनी आपल्या मलांना मराठी माध्यमातून शिक्षण देण्याला प्राधान्य द्याव, जेणेकरून मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी संस्कृती समृद्ध होईल असे प्रतिपादन पत्रकार संजय कुट्रे यांनी केले.वाढदिवसानिमित्त त्यांनी किणी (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेत मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले.यावेळी ते बोलत होते.


कुट्रे म्हणाले, गेली दहा वर्षं वाढदिवसानिमित्त गायरान जमिनीवर वृक्षारोपणाचा उपक्रम राबवत आलो आहे. पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम चालूच राहील. पण, या वर्षी जास्तीत जास्त मराठी शाळा टिकाव्यात यासाठी अंगणवाडी व शाळेतील विद्यार्थ्यांना वही, पेन्सिल व खाऊ वाटप करून वाढदिवस साजरा केला.


यावेळी मुख्याध्यापक मंगल पाटील, श्रीकांत पाटील, सुजाता पाटील, सुजाता मुतगेकर, आरती आवाड, शालेय कमिटी अध्यक्ष सुनील मनवाडकर, पी.जे मोहणगेकर, गुंडू जोशीलकर, समीर मुल्ला, अमित पाटील, इराप्पा नावलगी, संदीप गणाचारी, हर्ष कुट्रे, युवराज मनगुतकर, प्रथमेश कुट्रे, सुरेश कदम, अंजना कदम,मालू नौकुडकर, मंगल नांदूडकर, सुशा जोशीलकर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments