(मन, श्रद्धा आणि इच्छाशक्तीचा प्रवास)
पुणे/प्रतिनिधी : पंढरपूरच्या विठ्ठलाच्या ओढीने सर्वांचीच पावले पंढरीच्या दिशेने चालत आहेत .कोण पायी वारी करत आहे तर कोणी वाहनातून.पुणे येथे कामाच्या निमित्ताने असणारे महाराष्ट्राच्या विविध भागातील युवक चक्क सायकलने पंढरपूर वारी करत आहेत.या सायकल वारीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे
ही वारी केवळ सायकलवरची सफर नाही तर ती विठ्ठलाच्या ओढीने स्वतःवर विश्वास ठेवण्याची, शरीराची आणि मनाची कसोटी पाहणारी. 456 किमी सायकल प्रवासाची होती.प्रचंड आत्मविश्वास आणि अभिमान वाटणारी अशी ही सायकल पंढरी वारी. या वारीची २१ जून रोजी पहाटे 2 वाजता चिंचवड हून पंढरपूर च्या दिशेने निघाली आहे.या वारीचा मार्ग हडपसर, यवत , भिगवन, इंदापूर, टेंभुर्णी मार्गे पंढरपूर...हे अंतर आहे 230 किमी.चे आहे.एकमेकांना साथ देत, सर्वांची सकारात्मक ऊर्जा आणि पांडुरंगाच्या भेटीची ओढ यामुळे पायात ताकद येत असल्याने साकलपटू मजल दर मजल करत सायंकाळी ५ वाजता पंढरपूरमध्ये पोहोचले .यावेळी सर्व सायकल स्वारांचे शरीर थकलं होतं, पण मन मात्र खूप शांत, समाधानी आणि भावूक झालेलं दिसल.कारण विठुरायाचे दर्शनाची वेळ आता आली होती. या सर्वांनी माऊलीचे दर्शन घेतले अन आलेला सर्व थकवा कधी निघून गेला काही कळलेच नाही.
२२ जून– परतीचा प्रवासाला सुरवात झाली. खऱ्या अर्थाने सर्वांच्या मनाची परीक्षा होती.यावेळी बोलताना युवराज पाटील म्हणाले , पांडूरंग दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता परत परतीसाठी निघालो.फलटण, लोणंद, जेजुरी सासवड मार्गे पुणे.हा मार्ग होता ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा पारंपरिक मार्ग होता.पण ही राईड आम्हा सर्वच सायकल स्वारांच्या आयुष्यातील सर्वात कठीण राईड ठरली.मागच्या दिवसाचा थकवा, समोरून येणारा सततचा प्रचंड जोरदार वारा आणि सासवड परिसरात पालखीमुळे झालेली प्रचंड वारकऱ्यांची गर्दी.या सर्वाचा सामना करत सायकल ढकलत दिवे घाटातून जवळपास १०–१५ किमी अंतर चालतच यावे लागले.त्या गर्दीत सायकल चालवणं अशक्य होतं,पण मनात एकही नकारात्मक विचार आला नाही.सवंगड्यांनी दिलेली मानसिक साथ, आणि एकमेकांप्रती असलेली बांधिलकी यामुळे आम्ही हा प्रवासही हसत पार केला. थकलो होतो, दमलो होतो, पण मन पांडूरंगाच्या दर्शनाने समाधानाने भरून गेलं होतं.जर मनात श्रद्धा असेल, सकारात्मक दृष्टीकोन असेल, आणि सवंगड्यांची साथ असेल, तर अशक्य वाटणारी गोष्टही शक्य होत असल्याचे युवराज पाटील यानी महाराष्ट्र माझा 24 न्यूजशी बोलताना सांगीतले.
या सायकल वारी मध्ये युवराज पाटील, आनंद गुंजाळ, संदीप परदेशी, सुयोग शहा, कुमार हवालदार, शिवाजी काळे, चैतन्य वांजरे, नारायण पवार, अशोक पारेकर, संतोष ठूबे , राजेश पाटील, हेमंत दांगट, अनिल घारे, प्रतीक चटने, आनंद जाधव, सुनील फडके, शिवाजी पवार व रणजित सिंघ हे सायकल स्वार सहभागी झाले होते .
Post a Comment
0 Comments