Type Here to Get Search Results !

भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांना लेखी आश्वासनाची प्रतीक्षा.

 

(चंदगड भूमी अभिलेख कार्यालयाचे कामकाज ठप्प,महसूलमंत्र्यांसोबत मागण्याबाबत चर्चा,कर्मचाऱ्यांच्या अडचणीबाबत मार्ग काढण्याची ग्वाही)


चंदगड/प्रतिनिधी : चंदगड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी गेले २१ दिवस काम काम बंद आंदोलन सुरू आहे. यामुळे नागरिकांची कामे खेळंबली असून राज्य शासनाच्या महसूलावरही परिणाम होत आहे. 


या पार्श्वभूमीवर बुधवारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. मागण्याबाबत यावेळी चर्चा झाली. परंतू शासनाकडून लेखी आश्वासन मिळालेले नाही. त्यामुळे आज, गुरूवारी सर्व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. भूमी अभिलेख कार्यालयांनी कर्मचारी तांत्रिक वेतनश्रेणी मिळावी, नवीन आकृतीबंध, रिक्त पदांची भरती करावी, यासह अन्य मागण्यासाठी १५ मे पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी सलग २१ व्या दिवशी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन कायम होते. परिणामी मोजणी, प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गचे कामांचे भूसंपादन प्रक्रिया, बोजा चढविणे-उतरणे १० जूनपासून अशा फेरफार नोंदणी, नक्कल देणे, सुनावणी आदी कामाला ब्रेक लागला आहे. नागरिकांना नाहक त्रास होत आहे. 


केवळ कोल्हापूर जिल्ह्यातूनच सुमारे १५ कोटींचा महसूल ठप्प झाला आहे. मुंबई, नाशिक, औरंगाबाद येथील कर्मचारीही संपावर जाणार असून शासनाला तशी नोटीसही दिली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात कर्मचारी संघटनेसोबत बैठक घेतली. वीस मिनीटे चर्चा झाली. झालेल्या चर्चेचा इतिवृत्तांत आज, गुरूवारी प्रत्येक जिल्हाध्यक्ष आपले समक्ष संप ठिकाणी इतर कर्मचाऱ्यांसमोर मांडणार आहेत आणि संपाबाबत पुढील निर्णय सर्वानुमते घेण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments