Type Here to Get Search Results !

तृतीपंथीयांसाठी राज्य सरकार कटिबद्ध- सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ


मुंबई/प्रतिनिधी : राज्य सरकार कडून समाजातील तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण,आरोग्य आणि रोजगारात समान संधी देत योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. तसेच त्यांना मोफत व उच्च शिक्षण मिळावे यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. 


आतापर्यंत ४७८३ तृतीयपंथीयांना ओळखपत्र जारी करण्यात आले आहेत.उर्वरित ओळखपत्र लवकरच जारी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.तृतीयपंथीयांच्या सर्वांगिण विकासासाठी नवीन योजना तयार करणे, धोरणांचा आढावा, स्वतंत्र कक्ष, ओळखपत्र, स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण देण्याबाबत तसेच विभागीय व जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यासंदर्भात आढावा बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले.यावेळी आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, महसूल विभागांच्या अधिकाऱ्यांसह तृतीयपंथी संरक्षण व कल्याण महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments