Type Here to Get Search Results !

18 मे ला आलमट्टी धरणाच्या उंचीवाढीसंदर्भात चक्काजाम आंदोलन.

कोल्हापूर/प्रतिनिधी : अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यातील सर्वपक्षीय शेतकरी, व्यापारी, उद्योजक, व्यावसाईक आणि पुरबाधीत लोकांचा मेळावा पार पडला.या मेळाव्याला काँग्रेस नेते बंटी पाटील,खासदार धैर्यशील माने, आमदार अरुण लाड, आणि माजी आमदार उल्हास पाटील, कोल्हापूर इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर,शिवसेनेचे विजय देवणे यांनी उपस्थिती लावली होती.


या बैठकीमध्ये आलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात लढा चालू ठेवण्यासाठी संघठीत राहून काम केलं पाहीजे यावर एकमत झाले. या विरोधात आवाज उठवण्यासाठी कोल्हापूर आणि सांगलीतील नागरिकांचा अंकली फाट्यावर 18 मे रोजी चक्काजाम आंदोलन करण्याचे सर्वांनुमते ठरले.यावेळी जि.प. माजी सदस्य बी.एच पाटील, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील- चुयेकर, बाबासो चौगले, प्रकाश पाटील, माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, शेतकरी संघाचे संचालक दत्ता वारके, वसंतराव पाटील, बाबासो देवकर, भारत पाटील- भुयेकर, संजय शेट्ये, अमर समर्थ, आर जी तांबे, चंद्रकांत पाटील, सखाराम पाटील यांच्यासह इरिगेशन फेडरेशनचे अनेक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments