कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील वनहक्क प्रलंबित दाव्या संदर्भात व वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे,काँग्रेस नेते बंटी पाटील तसेच चंदगड, आजरा, भुदरगड आणि शाहुवाडी येथील शेतकरी शिष्टमंडळांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक पार पडली.
या बैठकीत वनहक्क संदर्भात प्रलंबित दावे, वनविभागातील नागरिकांच्या नागरी आणि विकासात्मक गरजा तसेच वन्यप्राण्यांपासून नागरिकांना आणि शेतपीकाला होणाऱ्या नुकसानीची भरपाई याबाबत चर्चा झाली.यावर जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांकडून माहीती घेऊन योग्य ती उपाय करण्याचे निर्देश दिले.यावेळी विजय देवणे, राहूल देसाई, कॉ. संपत देसाई, बयाजी शेळके, एम. जी. पाटील, बाजीराव पाटील, प्रकाश वास्कर यांच्यासह जिल्ह्यातील वनअधिकारी व बाधित शेतकरी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments