(अडकुर येथे नागरी सत्कार व शेतकरी मेळावा संपन्न,अजित पवार व हसन मुश्रीफ यांचा नागरी सत्कार)
चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : राजेश पाटील हा कामाचा माणुस,या मतदारसंघात 1600 कोटींची विकासकामे केली तरीपण यांचा पराभव झाला त्यामुळे गड आला पण सिहं गेल्याचे मनात शल्य असल्याचे अजित पवार म्हणाले.ते अडकूर येथील भव्य शेतकरी मेळाव्यात बोलत होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी आमदार कै. नरसिंगराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याहस्ते करण्यात आले.'येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयासाठी तुम्ही प्रयत्न करा,माझी साथ तुम्हाला असेल असा विश्वास अजित पवार यांनी राजेश पाटील यांना दिला.
यावेळी माजी आमदार राजेश पाटील बोलताना म्हणाले कि,माझा पराभव झाल्याने अजितदादा पवार हे फेटा बांधण्यास नकार दिल्याचे सांगतानाच आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता आणून अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत असे सांगत असताना ते भावुक झाले.हसन मुश्रीफ यांनी आपल्या दमदार भाषणात राजेश पाटील यांना सल्ला देताना सांगितले.माझा मागील निवडणुकीत पराभव झाला असताना मी दुसरा दिवसापासून कामाला लागलो आणि माझा आजपर्यंत विजयाचा रथ कोणीही रोखू शकला नाही.त्यामुळे आपणही लोकांच्या कामात अधिक लक्ष घातल्यास पुढील निवडणुकीत कोणतीही अडचण येणार नसून माझ्या सल्ल्याचा विचार करावा असे सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयसिंग चव्हाण यांनी केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेेकर,जिल्हा बँकेचे संचालक भैया माने,राष्ट्रवादीच्या मुलुख मैदान तोफ शितलताई फराकटे,सुधीर देसाई, विकी कोणकेरी, जयपाल मुंनोळी, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भिकू गावडे, निखिल पाटील, अभय देसाई,तालुका संघाचे व्हाईस चेअरमन तानाजी गडकरी,पांडुरंग बेनके, प्रवीण वाटंगी यांच्यासह गडहिंग्लज,आजरा,चंदगड मधील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास पाटील त्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
Post a Comment
0 Comments