चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील अथर्व-दौलत साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२५-२६ च्या तोडणी वाहतुक कराराचे ऍडव्हान्स चेक वाटप कार्यक्रम कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला.या कार्यक्रम सोहळ्यासाठी कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे, संचालक विजय पाटील,मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील, लेबर ऑफिसर अश्रू लाड यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमप्रसंगी चेअरमन मानसिंग खोराटे म्हणाले,"साखर उद्योगाला सध्या विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे.तरीपण शेतकऱ्यांची ऊस बिले, कामगारांचे पगार,तोडणी वाहतूकदारांची बिले यासारख्या गोष्टी वेळेत पूर्ण करणे ही आमची प्राथमिकता जबावदारी असून भविष्यातही सर्व बिले वेळेत दिले जातील.तसेच कारखाना कार्यक्षेत्राचा भोगोलिकदृष्ट्या अभ्यास करुन येणाऱ्या काळात AI तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतक-यांचे एकरी उत्पन्न वाढीवर भर देणार आहे. त्यासाठी शेतक-यांना मेळाव्याद्वारे मार्गदर्शन व ऊस विकास योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे.हा दौलत साखर कारखाना शेतकऱ्यांच्या विश्वासावर उभा असल्याने शेतकरी, तोडणी-वाहतूक कंत्राटदार, कामगार यांचे पूर्ण सहकार्य आमच्या पाठीशी असल्याने हीच आमची खरी ताकद आहे.येणाऱ्या गळीत हंगामात उच्चांकी गाळप करत कारखाना राज्यात आदर्श ठरेल,असा विश्वास देत त्यांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन केले.
यावेळी तोडणी वाहतूक कंत्राटदार मधुकर करडे, रामा वांद्रे, सागर पाटील, संजय सुस्तकर, सचिन देसाई, राजेंद्र फाटक, कृष्णा पाटील, जोतीबा पाटील, राजराम लांडे, परशराम नाईक, संजय सुरुतकर व मोठ्या संख्यने शेतकरी हजर होते.या कार्यक्रमाचे स्वागत मुख्य शेती अधिकारी युवराज पाटील यांनी तर आभार लेबर ऑफिसर अश्रू लाड यांनी मांडले.
Post a Comment
0 Comments