पुणे/प्रतिनिधी : पुण्यातील नागरिक रहिवाशी संघ चंदगड तालुका यांच्यावतीने ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या पायी दिंडी वारकऱ्यांसाठी दिवे घाटात खजूर व पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम अध्यक्ष मारुती ओमाना शिट्याळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली पाच वर्षे चालविला आहे.तसेच या संघटनेमार्फत पुण्यामध्ये चंदगड भवन उभारण्याचा संकल्प केला आहे.
नागरिक रहिवासी संघ चंदगड यांच्याकडून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात.यामध्ये चंदगड तालुक्यातील असंख्य चंदगड वाशी सामील असून हा संघ नेहमी सक्रिय असतो.या सामाजिक उपक्रमांमधून कित्येक लोकांना सहकार्य केले जाते.त्यामुळे चंदगड तालुका रहिवासी संघाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे
Post a Comment
0 Comments