मुंबई/प्रतिनिधी : तृतीयपंथीयांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून त्यासाठी तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या सदस्यांना विविध बैठका आणि प्रवासासाठी मानधन देण्यात येईल अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.तसेच मुंबईमध्ये कार्यालयासाठी जागा देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाची पहिली बैठक मंत्री शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली.या बैठकीस आमदार सर्वश्री बालाजी किणीकर, आनंद बोंढारकर,अमोल मिटकरी, विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, बार्टीचे महासंचालक सुनील वारे,मंडळाच्या उपाध्यक्ष डॉ.सान्वी जेठवानी,राणी ढवळे,अडॅ.पवन यादव,अर्पीता भीसे,डॅा.सलमा खान,पार्वती जोगी,मयूरी आळवेकर,ॲड.शिवानी सुरकार,डॅा. योगा नंभीयार,शिवानी गजबार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments