कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी सन 2025-26 सालाकरिता चंदगड तालुक्यातून राहुल रामचंद्र पाटील रा.यशवंतनगर यांची निवड झाली.गुरुवारी 26 जून रोजी कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार छत्रपती शाहू महाराज, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. आदी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राहुल पाटील हे वीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. चंदगड तालुक्यातून नियमितपणे प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक सत्य घटना या वृत्तपत्राचे ते संपादक आहेत.सामाजिक बांधिलकी जपत त्यांची या क्षेत्रात वाटचाल सुरू आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यात देखील त्यांचा सहभाग असतो.या पुरस्काराबद्दल राहुल पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Post a Comment
0 Comments