Type Here to Get Search Results !

आजऱ्यातील रद्द केलेला जिल्हा परिषद मतदार संघ पूर्ववत करावा-समरजितसिंह घाटगे

आजरा/प्रतिनिधी : समरजितसिंह घाटगे यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भेट घेतली.या भेटीदरम्यान आजऱ्यातील रद्द केलेला जिल्हा परिषद मतदार संघ पूर्ववत करावा,अशी मागणी घाटगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 


याबाबत ग्राम विकासमंत्री जयकुमार गोरे यांना भेटणार असून तो पुर्ववत करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे मंत्री आबिटकर यांनी यावेळी सांगितले. नुकतेच राज्य निवडणूक आयोगामार्फत जिल्हा परिषद व  पंचायत समितींच्या प्रभाग रचना करण्याच्या कामास आदेश दिले आहेत.त्याप्रमाणे संबंधित यत्रणेचे कामकाज चालू झाले आहे. पण यामध्ये आजरा तालुक्यामध्ये पूर्वी अस्तित्वात असलेले जिल्हा परिषदेचे तीन ऐवजी दोन मतदारसंघ होऊन नव्याने प्रभाग रचना केली जाणार आहे.या तालुक्यातील जवळपास ४० गावांवर अन्याय होणार आहे.अशा परिस्थितीमध्ये या तालुक्याची जिल्हा परिषद व पंचायत समितीची प्रभाग रचना पूर्वीप्रमाणेच आहे तशी ठेवणे आवश्यक आहे.जेणेकरून या लोकांवर अन्याय होणार नाही व येथील विकास कामाकरिता स्थानिक नेतृत्व तयार होईल व या भागाचा अधिकधिक विकास साधला जाईल अशी निवेदनाद्वारे भूमिका समरजितसिंह घाटगे यांनी घेतली.

Post a Comment

0 Comments