चंदगड (प्रतिनिधी) :जट्टेवाडी (ता. चंदगड) येथे मा. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियान अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.पर्यावरण संतुलन आणि संवर्धनाच्या दृष्टीने ग्रामस्थ व महिला मंडळ यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी चंदगड तालुक्याचे कृषी सहाय्यक एस. डी. मुळे आणि एस. डी. खुटवळ यांनी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले.गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून गुलमोहर, उलटा अशोक, चिंच, कॉफी, तेजपत्ता, सुपारी, बेल अशा विविध १०० हून अधिक झाडांची लागवड केली. या उपक्रमातून पर्यावरण रक्षणाबरोबरच इतर गावांसाठी प्रेरणादायी उदाहरण उभे राहिले आहे.या कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच रेणुका बुवा,उपसरपंच विजय पाटील तसेच मराठी शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत पाटील यांनी केले.तर आभार परशराम पाटील यांनी मानले.
Post a Comment
0 Comments