Type Here to Get Search Results !

वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा-आ.शिवाजीराव पाटील


चंदगड प्रतिनिधी/रुपेश मऱ्यापगोळ : पंढरपूरचा गजर, टाळ-मृदंगाचा नाद, विठ्ठल नामस्मरण, आणि वारकऱ्यांची भक्तिभावाने ओतप्रोत भरलेली दिंडी!


याच आषाढी वारीच्या निमित्ताने बेळगाव  तालुक्यातील कुद्रेमानी गावातील विठ्ठलभक्त वारकरी मंडळींची पंढरपूरमध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली.यावेळी आमदारांनी वारकऱ्यांशी आपुलकीने संवाद साधत, त्यांच्या भक्तिभावाचे व त्यागमय सेवाभावाचे मन:पूर्वक कौतुक केले."वारकरी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. त्यांच्या नित्यनेमाने वारीतल्या सहभागामुळेच आपल्या संस्कृतीचं दर्शन पिढ्यान्-पिढ्यांना घडत आहे," असे गौरवोद्गार आमदार पाटील यांनी काढले.चंदगड तालुक्यातील इतर वारकरी दिंड्यांनाही सदिच्छा भेटी देत आपला सांस्कृतिक, आध्यात्मिक व सामाजिक ऋणानुबंध अधिक दृढ केला.



या भेटीदरम्यान बाळाराम कदम,सुरेश पाटील,शिवाजी गुरव,गावडू पाटील,नाना पाटील,शांताराम गुरव,परशुराम काकतकर,बबन गुरव,संतोष पाटील,लक्ष्मण पन्हाळकर,निंगाप्पा नाईकसह आदी वारकरी मंडळी उपस्थित होती.

Post a Comment

0 Comments