या उल्लेखनीय निवडीनंतर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रात नवचैतन्याचे वारे वाहू लागले आहेत."ही निवड म्हणजे फक्त पदाची प्रतिष्ठा नव्हे, तर मराठी साहित्य आणि शिक्षण क्षेत्राला मिळालेला विश्वासाचा ठेवा आहे," असे गौरवोद्गार रविंद्र पाटील यांनी यावेळी काढले.संजय साबळे यांनी आजवर १७ हून अधिक पुस्तके, चारोळ्या, काव्य, विचारलेखन व प्रेरणादायी साहित्य सादर करून मराठी साहित्यविश्वात आपले ठसा उमटवला आहे.त्यांच्या नावावर ९ जिल्हा व राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार आणि ३ साहित्य पुरस्कार असून, हे त्यांचे साहित्यिक योगदान आणि सेवाभाव अधोरेखित करते.ते चंदगड मराठी अध्यापक संघाचे मार्गदर्शक असून, शिक्षक हक्कांसाठी आवाज उठवणारा एक समर्पित नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
या सन्मानप्रसंगी जोतिबा बडसकर, संध्या साबळे, शार्दुल साबळे व आर्या साबळे यांची उपस्थिती लाभली.हा सन्मान म्हणजे चंदगडसारख्या सीमावर्ती भागातील साहित्यिक चळवळीला मिळालेला नवा ध्यास असून, त्यांच्यावर साहित्यिक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Post a Comment
0 Comments